अनगर शहराला जी सुसंस्कृत,
विधायक राजकीय परंपरा लाभली आहे, त्या परंपरेतील तरुण नाव म्हणजे बाळराजे
राजनजी पाटील . जन्माने अनगरकर असलेल्या बाळराजे यांचे शालेय शिक्षण
प्रवरानगर आणि अनगर दोन शहरांमध्ये झाले आहे. या दोन्ही शहरातील वैचारिक,
सांस्कृतिक, सामाजिक घडामोडीचा परिणाम त्यांच्या उमलत्या मनावर झाला आणि
त्यांची पावले विद्यार्थीदशेतच समाजकारणाकडे वळली. देशप्रेम, सामाजिक
बांधिलकी आणि सकारात्मक राजकारण याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आहे.
त्यांचे आजोबा कै.लोकनेते बाबुराव पाटील हे होते. आजोबांच्या त्यागी,
सत्शील जीवनापासून बाळराजेना प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून निर्माण
झालेल्या ऊर्जेला योग्य वळण आणि दिशा मिळाली, ती बाळराजेचे वडील
माननीय राजनजी पाटीलसाहेब यांच्या राजकीय कर्तुत्वामुळे. महाराष्ट्राच्या
राजकीय वर्तुळात राजनजीसाहेबांचे स्थान वरचे आहे. एक कलाप्रेमी,
सुसंस्कृत, सकारात्मक विचारसरणीचे, संघटनकुशल आणि जनाहित दक्ष नेते म्हणून
राजनमालक ओळखले जातात. असा वडिलांच्या सहवासात, त्यांचा राजकीय प्रवास
अनुभवत बाळराजेचीं जडण घडण झाली .
साहाजीकच आपल्या महाविद्यालयीन काळामध्येच बाळराजे समाजाकारणात, राजकारणात
सक्रीय झाले . मुलुंडच्या मुलुंड कॉलेज ऑफ
कॉर्मस मधून त्यांनी वाणिज्य शाखेची
पदवी मिळवली आहे. या काळात आपली साधी राहणी, मनमिळावू स्वभाव,
दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, सगळ्यांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती
यातून त्यांनी आपल्या सहाध्यायांची मनें जिंकली.या विद्यार्थ्यांच्या
प्रेमामुळेच ते महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी म्हणून बिनविरोध निवडून आले.
जी.एस. म्हणून काम करताना त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि
विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबवले आणि आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.
बी.कॉम.ची पदवी मिळाल्यानंतर निरंजन यांनी गव्हन॔मेंट लॉ कॉलेजमधून एल .एल
.बी .चे शिक्षण पूर्ण केले.
प्रभावशाली वडील असल्याने, एक यशस्वी वकील म्हणून सुखाचे, चाकोरीबध्द
आयुष्य निरंजनजी सहज जगू शकले असते.पण रक्तातील समाजसेवेची ओढ आणि लोकांचे
नेतृत्व करण्याचा, समाज अधिक सक्षम, संपन्न बनवण्याचा ध्यास यामुळे
चाकोरीबध्द मार्ग न निवडता निरंजनजीनी सार्वजनिक कार्यात लक्ष घातले. केवळ
वडिलांच्या स्थानाचा, प्रभावाचा वापर करून एखादे पद मिळवणे निरंजनजीच्या
मानी स्वभावात बसणारे नाही. त्यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्याला आरंभ केला,
तो 'समन्वय प्रतिष्ठान ' या सामाजिक - सांस्कृतिक संस्थेची स्थापना करून.
१२ जुलाई २००३ रोजी आषाढी एकादशीचे औचीत्य साधून पं. भीमसेन जोशी यांचा
संतवाणी हा कार्यक्रम आयोजित करून निरंजनजीने समन्वयाची दिंडी सुरु केली.
समन्वय प्रतिष्ठान ही निव्वळ प्रसिध्दीचा झगमगाट करून काम केल्याचा देखावा
निर्माण करणारी संस्था नाही. समविचारी, उत्साही, तळमळीच्या युवकांना एकत्र
करून, समाजातील वेगवेगळ्या स्तरांमध्ये समन्वय साधण्याचा आणि सामाजिक
प्रगतीला गती देण्याचा प्रयत्न निरंजनजी करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रापासून
ते क्रीडा क्षेत्रापर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा, उपक्रम करून समन्वय
प्रतिष्ठानने आपली जबाबदारी समर्थपणे पूर्ण केली आहे. समन्वयाच्या आजवरच्या
वाटचालीतील महत्वाचे टप्पे सांगायचे झाले तर ----- २५००० शालेय
विद्यार्थ्यांचा 'एक सूर एक ताल ', भारताच्या विविध राज्यातील २२५ युवा
बॉक्सर सहभागी झालेली राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा, युवकांना मार्गदर्शन
करणारी व्हिजन करिअर फेअर, अपंगासाठी आयोजित केलेली क्रिकेट मालिका, रिक्षा
चालकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी जनश्री योजनेचं वाटप, सिद्धिविनायक
न्यासाच्या मोफत पुस्तक पेढी योजनेची अंमलबजावणी, आध्यात्मिक मार्गदर्शक
जयां राव यांच्या प्रवचन मालेचे आयोजन ... समन्वयाच्या या कार्याक्रमावरून
निरंजनच्या व्यापक दृष्टीची आणि कार्यक्षमतेची कल्पना येते.
बाळराजेसाहेबांचे हे कार्यकौशल्य पाहुनच २००८ साली त्यांच्यावर राष्ट्रवादी
विद्यार्थी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात
आली. आपल्या या नव्या जबाबदारीचा शुभारंभ
करताना बाळराजेसाहेबांनी राज्यव्यापी शैक्षणिक अभियान सुरु केले.
त्यानिमित्ताने राज्यभरात ७५ ठिकाणी 'करिअरच्या वाटा' हे प्रदर्शन भरवण्यात
आले. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी औरंगाबाद,
कोल्हापूर, नाशिक, बीड, नागपूर, रत्नागिरी, अकोला, पुणे असा दौरा केला.
महाराष्ट्रातील कला महाविद्यालयातील अध्यापकांचे प्रश्न मार्गी लागावेत
म्हणून राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.राजेश टोपे
यांना निवेदन सादर केले. ११ वी प्रवेशाबाबतचा गोंधळ दूर व्हावा म्हणून
जुलाई २००९ मध्ये शिक्षण तज्ञांचा परिसंवाद आयोजित करून, त्याचा वृत्तांत
शासनाला सादर केला. २००९ मध्येच तत्कालीन शिक्षण मंत्री मा. पतंगराव कदम
यांना निवेदन सादर करून आय.सी.एस.इ आणि सी. बी.एस.इ. बोर्डाच्या शाळांमध्ये
मराठी विषय सक्तीचा करण्याचे आश्वासन मिळवले. त्याचप्रमाणे २०१० साली ११
वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुकर व्हावी म्हणून तत्कालीन शिक्षण मंत्री
मा. बाळासाहेब थोरात यांना अहवाल सादर केला.
समन्वयातून समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी निरंजनजी सज्ज आहेत. आपल्या सौम्य
पण ठाम व्यक्तिमत्वाचा,स्ववर्तनाचा, सकारात्मक विचारसरणीचा ठसा निरंजनजींनी
जनमानसावर उमटवला आहे. राजकारण आणि समाजकारण यांचा योग्य समन्वय साधणारे
निरंजनजीनसारखे नेतृत्व ही आजच्या काळाची गरज आहे . जाणकार, सुबुध्द
नागरिकांच्या सहकार्याने,पाठीम्ब्याने निरंजनजींचा हा प्रवास असाच पुढे
सुरु राहील आणि एक सुदृढ, सक्षम, संपन्न समाज घडवण्याचे त्यांचे स्वप्न
साकार होईल यात शंका नाही.
* तलवार ग्रुप कार्यकारी मंडळ *
अनु.क्र. | नाव | मोबईल न. |
१. | बालाजी नानासाहेब पवार | ३०/५/४१ ते २०/७/४५ |
२. | सिध्येश्वर मारुती कोळी | २१/७/४५ ते १५/४/४९ |
३. | महादेव नानासाहेब पवार | |
४. | सोमेश्वर मारुती कोळी | |
५. | संतोष चन्द्र्हार गुंड | २८/२/७१ ते २९/३/७३ |
६. | प्रशांत उतरेश्वर पवार | ३०/३/७३ ते ३१/३/७९ |
७. | शितल किसन गुंड | १/४/७९ ते १५/१०/८४ |
८. | लहु पोपट गुंड | १६/१०/८४ ते ७/४/९१ |
९. | पंढरिनाथ किसनराव कटके | ८/४/९१ ते २०/१/९३ |
१०. | माणिकराव अमृतराव सातव पाटील | २१/१/९३ ते २०/१/९८ |
११. | सौ.रंजना सदानंद ढोले | २१/१/९८ ते १४/१०/०१ |
१२. | श्रीमती प्रमिलाताई कुंडलिक लोखंडे | १५/१०/०१ ते २०/१/०३ |
१३. | पंढरिनाथ किसन कटके | २१/१/०३ ते १६/१/०६ |
१४. | रामदास दत्तात्रय दाभाडे | १७/१/०६ ते २२/४/०७ |
१५. | वसंत पिलाजीराव जाधवराव (प्रभारी) | २३/४/०७ ते २८/९/०७ |
१६. | शिवदास मनोहर उबाळे | २९/९/०७ ते २०/१/०८ |
१७. | सौ.जयश्री राजेंद्र सातव पाटील | २१/१/०८ ते १३/८/१० |
१८. | सौ. स्वाती कमलाकर सातव पाटील | १४/८/१० |
Subscribe to:
Posts (Atom)